नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘काटकसरीच्या’ आवाहनावर जोरदार टीका केली आहे. आखाती देशांतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश दौरे टाळण्याचे आणि बचतीवर भर देण्याचे आवाहन केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारचे हे आवाहन म्हणजे संकट हाताळण्यात आलेल्या अपयशाची कबुली आहे. सरकार स्वतःची जबाबदारी सामान्य जनतेवर ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच, पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘काटकसरीचा सल्ला म्हणजे अपयशाची कबुली’
By Team LBNN
On: May 11, 2026 11:41 AM






