Phaltan – भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने फलटण येथे उत्साहात कार्यक्रम पार पडला. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी महावीर स्तंभ येथे उपस्थित राहून भगवान महावीरांना अभिवादन केले.
याच प्रसंगी नगराध्यक्ष समशेरसिंह यांनीही महावीर स्तंभास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. उपस्थित मान्यवर, नागरिक आणि जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर असून त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये वैशाली येथे झाला. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली आणि सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अस्तेय या पंचमहाव्रतांचा संदेश दिला.
त्यांनी जगाला “जगा आणि जगू द्या” हा महान संदेश दिला, जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे.
भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, सत्य आणि त्यागाचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे विशेष महत्त्व आहे .







