सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण रखडले; पंढरपूर पुलावरील ग्रील गायब – नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

On: April 21, 2026 9:40 AM
Follow Us:


काँक्रीट फोडून लोखंड लंपास; प्रशासनाचे दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव?

फलटण : फलटण शहर व परिसरातून जाणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या जिंती नाका ते राव रामोशी पूल या दरम्यान सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम सध्या रखडल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असून गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही ठोस प्रगती दिसत नाही.
मागील पंचवार्षिक निवडणुकांदरम्यान या कामाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. बारामतीप्रमाणे कालव्याचे अस्तरीकरण आणि सुशोभीकरण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, पंढरपूर पुलावरील सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. जुन्या पुलावरील पादचारी मार्गाच्या संरक्षक कठड्याचे काँक्रीट फोडून त्यातील लोखंडी ग्रील अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय, गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी नवीन पुलावरील संरक्षक ग्रील कापण्यात आले होते. मात्र उत्सवानंतर ते पुन्हा बसवण्यात आले नाही. उलट तेथे पडून असलेले ग्रीलही गायब झाल्याने चोरीचा संशय व्यक्त केला जात आहे.
या निष्काळजीपणामुळे पुलावरून जाणाऱ्या पादचारी, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

हे ही वाचा  फिरंगाई देवी, महादेव व भैरवनाथ यात्रेसाठी फलटण नगरपालिकेची खर्चास मंजूरी ; ४६ विषयांवर सविस्तर चर्चा बहुतांश सर्व ठराव बहुमताने मंजूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

नळाला मोटार लावल्यास जप्ती; पाणी बचतीचे सातारा नगरपरिषदेचे आवाहन

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटणसाठी १२३० घरकुलांचे उद्दिष्ट; नागरिकांनी लाभ घ्यावा – मुख्याधिकारी निखिल जाधव व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांचे आवाहन

“मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या माहीत; पानंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला” – आमदार सचिन पाटील

फिरंगाई देवी, महादेव व भैरवनाथ यात्रेसाठी फलटण नगरपालिकेची खर्चास मंजूरी ; ४६ विषयांवर सविस्तर चर्चा बहुतांश सर्व ठराव बहुमताने मंजूर

error: Content is protected !!