सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मातंग समाजाने हिंमत आणि धैर्य ठेवून वर्गीकरणाचा लढा लढावा – अजिंक्य चांदणे

On: August 31, 2026 11:25 AM
Follow Us:

चंद्रपूर : महाराष्ट्रातील मातंग समाजाने हिंमत आणि धैर्य कायम ठेवत वर्गीकरणाच्या न्याय्य मागणीसाठीचा लढा अधिक बळकट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अजिंक्य चांदणे यांनी केले.

मातंग समाजाचे मनोबल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सध्या होत असल्याचे सांगत चांदणे म्हणाले की, समाजबांधवांनी कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नये किंवा हिंमत सोडू नये. या लढ्यात अपमान, विरोध आणि विविध प्रकारचे अडथळे निर्माण केले जाऊ शकतात; मात्र त्यामुळे विचलित न होता आपली चळवळ अधिक मजबूत करण्याची गरज आहे.

“मैदान सोडायचे नाही, तर हिमतीने लढायचे आहे. चळवळ बळकट करा, एकसंघ राहा आणि निर्भीडपणे पुढे चला. एकजुटीचा हा रथ वर्गीकरणाच्या चळवळीला निश्चितच यश मिळवून देईल,” असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना अजिंक्य चांदणे यांनी सामाजिक न्यायाच्या या लढ्यात विचारांना अधिक धार देण्याचे आवाहन केले. “चळवळ मजबूत करा आणि मैदान जिंका. हा लढा केवळ आजचा नसून भविष्यातील पिढ्यांच्या सन्मानासाठी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा  वर्गीकरणाच्या नावाखाली मातंग समाजाला टार्गेट करणे थांबवा – अजिंक्य चांदणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!