
फलटण – फलटण शहरातील जाधववाडी परिसरात कार्यरत असलेल्या योद्धा करिअर अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यांची नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत निवड झाली आहे. याआधीही अकॅडमीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळवले असून, या नव्या यशामुळे अकॅडमीचा लौकिक अधिकच वाढला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी पार पडलेल्या या भरती प्रक्रियेत एकाच वेळी २२ विद्यार्थ्यांची निवड होणे ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महादेव नवत्रे (पुणे शहर), ओम पिसे (पुणे शहर), साईराज जाधव (पुणे शहर), जिया कोरबू (मुंबई लोहमार्ग), अंकिता चौगुले (पिंपरी-चिंचवड), पृथ्वीराज काळे (नाशिक ग्रामीण), प्राजक्ता बोडरे (पुणे शहर), ओमकार काळभोर (पुणे शहर), सौरभ झुंजारे (पुणे शहर), आरती शिंदे (पुणे शहर), सोहेल इनामदार (पुणे शहर – चालक), मयुरी कदम (पुणे शहर), नवाज शेख (पुणे शहर), सनी निकम (पुणे शहर), सनी पोळ (पिंपरी-चिंचवड), कोमल रुपनवर (पुणे शहर), ऋतुजा लंबाते (पुणे शहर), विशाल बंडगर (पुणे शहर), आस्मा शेख (पिंपरी-चिंचवड), जान्हवी धनावडे (पिंपरी-चिंचवड), गणेश गोरे (मुंबई लोहमार्ग) आणि मयुरी चव्हाण (रायगड पोलीस) यांचा समावेश आहे.
या यशामागे अकॅडमीचे संस्थापक व मार्गदर्शक रणजीत तांबे सर, गणेश तांबे सर, नाळे सर आणि भंडलकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे.
ग्रामीण भागातून गुणवंत घडवत योद्धा करिअर अकॅडमी युवकांसाठी यशाचा नवा मार्ग निर्माण करत आहे.










